गोष्ट राजा दिनकर केळकर संग्रहालयाची
कवी अज्ञातवासी यांच्या कवितांइतकाच, किंबहुना काहीसा जास्तच प्रभाव त्यांनी आयुष्यभर कष्टपूर्वक जमवलेल्या पुराणवस्तूंच्या संग्रहानं महाराष्ट्रावर टाकलेला आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना जुन्या वस्तू, चित्रं, शिल्पं, मूर्ती, दागदागिने, वाद्यं गोळा करण्याचा जो ध्यास लागला, तो वयाच्या ९५ व्या वर्षी निधन होईपर्यंत त्यांनी प्राणपणानं जपला. आणि अक्षरशः तनमनधन अर्पून आजचं वस्तुसंग्रहालय उभं केलं.......